Sunday, 22 September 2013

लोणार सरोवर प्रदक्षिणा : एक अविस्मरणीय अनुभव

माझ्या आजवरच्या आयुष्यात खरंतर मी खुप प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. पण लोणार सरोवर मात्र नेहमीच एक विशेष अनुभव राहिला. शासन आणि स्थानिक लोकप्रतिनीधीँच्या उदासीनतेमुळे विनाशाकडे झुकलेला ५० हजार वर्षापूर्वीचा हा जागतिक आश्चर्याचा ठेवा उपेक्षा सोसूनही आजही विश्वाला खुणावतो आहे. लोणार सरोवर आमच्या मेहकर या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे खुप खुप तर २०-२५ किमी! तसं तर लोणारला मी नेहमीच जातो आणि लहानपणी दरवर्षी आईसोबत नवरात्रीमध्ये लोणार सरोवराच्या मध्यभागी वसलेल्या कमळजा देवीच्या दर्शनला सुद्धा आवर्जून जायचो पण एक गोष्ट मला नेहमीच खुनवायची ती म्हणजे लोणार सरोवराची प्रदक्षिणा! लोणार सरोवराची प्रदक्षिणा हा एक सुखद अनुभव आहे. खास करून अशा निसर्गप्रेमींसाठी ज्यांना ट्रेक वगैरे ची विशेष आवड आहे. लोणार सरोवराला प्रदक्षिणा मारताना काही वर्षांपूर्वी हा जागतिक आश्यार्याचा  ठेवा किती सुंदर असेल या कल्पनेनेच मन अगदी प्रसन्न होते. परंतु मी वर नमूद केल्याप्रमाणे फक्त आणि फक्त शासनाच्या उदासीनतेमुळे आज हा जागतिक वारसा विनाशाकडे झुकला आहे. बरयाच पर्यटकांसाठी लोणारला भेट हि फक्त तेधील धार बघण्यापूर्वी मर्यादित आहे. लोणार सरोवराच्या डाव्या बाजूने कमळजा देवी मंदिरापर्यंत चांगली पायवाट आहे. कमळजा देवी मंदिर म्हणजे लोणार सरोवर प्रदक्षिणेचा मध्यबिंदू! नवरात्रीच्या काळात भक्तांची ये जा याच रस्त्याने होते. परंतु  सरोवराच्या उजव्या बाजूने रस्ता थोडा निर्मनुष्य होतो. अवैध वृक्षतोड वगैरे प्रकार बघायला मिळू शकतात. म्हणून या बाजूने थोडी सावधगिरी बाळगायला हवी. 
Lonar Sarovar
Add caption

Wednesday, 31 July 2013

मराठी वृत्त वाहिन्यांची जीवघेणी स्पर्धा

काही वर्षांपूर्वी कोणी विचार पण केला नसेल आज एवढ्या वृत्तवाहिन्या सध्या मराठी भाषेत येवू घातल्या आहेत. पण स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणवनाऱ्याया या मराठी वृत्त वाहिन्यांना आज 'आदर्श' पत्रकारितेचा मात्र साफ विसर पडत चाललाय. तरीपण हिंदी वृत्त वहिन्यांच्या तुलनेत त्यांचा दर्जा कितीतरी सरस आहेत यात मात्र मुळीच शंका नाही.

Wednesday, 20 June 2012

आरोग्यमंत्र्यांनी आमिर खानची मदत मागणे हास्यास्पदच आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी आमिर खानची मदत मागावी हे हास्यास्पद वाटले. दुसऱ्या बाईसाठी आपल्या बायकोचा त्याग करणाऱ्यांनी या विषयाबद्दल न बोललेलंच बरं. एका घटस्फोटित मुलीचा बाप या नात्याने मला अनेकदा प्रश्न पडतो की ज्या मुलींना आपण एवढे लाडात वाढवतो त्यांचं भविष्य मात्र अधांतरीच असतं. कुणी आमिर खानसारखा भेटला की झाले वाटोळे.आमीर खानसारख्या लोकांमुळेच कदाचित स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले असावे. आरोग्यमंत्र्यांनी स्वत:चे पद, आमीरच्या पहिल्या पत्नीच्या भावना व आमिरची योग्यता या गोष्टींचा विचार करायला हवा होता.


Tuesday, 12 June 2012

मी आज ज्या विषयावर प्रकाश टाकत आहे तो खूपच गंभीर आणि संवेदनशील विषय आहे तरी कोणीहि कृपया याला वयक्तिक स्वरूप किंवा चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न अगोदरच करू नये.पूर्ण वाचा आणि मनापासून विचार करावा हि नम्र विनंती. परवा मित्रांसोबत गप्पा मारत असताना मी एका मित्राला विचारले कि मग कधी करतोय लग्न तो क्षणात उत्तरला बघतोय कुठे ब्राह्मणाची मुलगी मिळतेय का.तो मित्र ब्राह्मण नव्हता. मग मी त्याला विचारले का तुझ्या जातीतल्या मुली संपल्या का? त्यावर तो बोलला तसे काही नाही चिक्कार आहेत पण ब्राह्मणाच्या मुलीमध्ये जी गोष्ट आहे ती इतरांमध्ये कुठे आहे हि अभिमानाची गोष्ट जर सोडली तर तो पुढे काय बोलला हे ऐका ब्राह्मणांच्या मुली लगेच पटतात आणि पळून जाणार्या मुलींमध्ये ब्राह्मणांच्या मुलींचे प्रमाण जास्त आहे.हे ऐकल्यावर मी त्याला बोललो असे काही नाही तेवढ्यात त्याने मला जवळचे ८ उदाहरण सांगितले आणि आमचा विषय इथे संपला. मी नंतर या गोष्टीवर विचार करीत असतात्ना एक विचार सहज मनात आला मुली तर सर्वच जातीतील पळून जातात मग ब्राह्मणांच्या मुलीं बद्दल असा लोकांचा समज का आहे.मग मी पडताळणी केल्या नंतर मी सुद्धा थोडा प्रमाणात मित्राच्या बोलण्याशी मनातून सहमत झालो. ज्यांनी कोणी हि पोस्ट वाचलीय त्यांनी अगोदर विचार कर कि आपल्या आसपास असे प्रमाण किती आहे.खरच ब्राह्मणाच्या मुलीना इतर समाज्यातील मुलीपेक्ष्या जास्त सूट दिल्यामुळे असे घडतेय का? हे एकाच कारण नाहीये तर असी अनेक कारणे माझ्या समोर आली जशी कि ब्राह्मण समाज हा संस्कारासाठी ओळखला जातो आणि आज आपल्याच समाज्यातील मुलांमध्ये ते प्रमाण कमी बघायला मिळते.ब्राह्मणा च्या किती मुलांनी दुसर्या जातीतील मुलीशी लग्न केलेले कधी ऐकले आहे का असेल तरी प्रमाण खूप कमी आहे.जो माझा मित्र बोलला त्यावरून मी हे सर्व काही लिहित नसून असे अनेक वेळा घडल्या नंतरच मी ह्या विषयायावर प्रकाश टाकायचे ठरविले कृपया मनापासून सांगा जी गोष्ट माझ्या सोबत घडली ती किती जणांसोबत घडली आहे चेष्टेत का होईना.


Saturday, 11 February 2012

!! कर्नाटकातील भाजपा सरकारचे त्रिवार अभिनंदन !!

छत्रपती शिवरायांची जयंती यापुढे या वर्षापासून कर्नाटकात महाराष्ट्राप्रमाणेच साजरी होणार असे जाहीर आदेश तेथील मुख्यमंत्री गौडा यांनी जाहीर केले आहे.शिवराय हे प्रादेशिक महापुरुष नसून राष्ट्रीय पुरुष असून त्यांच्याबद्दल कोणीही वाद घालू नये असे त्यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रातील कट्टर शिवभ्क्तासाठी हि मोठी पर्वणीच आहे. हळूहळू हा मोठा विचार देशातील इतर प्रांतातही जाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येवून प्रयत्न केले पाहिजे हि शिवप्रभूंच्या चरणी प्रार्थना.